Copyright © 2020 All rights reserved
Contact Us - mpsctestportal@gmail.com
July 11, 2025 | by MPSC Admin
मुंबईतील ऐतिहासिक कार्नाक पूल आता ‘सिंदूर पूल’ म्हणून ओळखला जाईल. ब्रिटिश काळातील गव्हर्नर जेम्स रिवेट-कार्नाक यांच्या नावाने १८६८ साली बांधलेला हा पूल, काळाच्या ओघात जुनाट आणि असुरक्षित ठरला होता. त्यामुळे २०२२ मध्ये तो पाडण्यात आला आणि नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. कर्नाक ब्रिजचे नामांतर
१० जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या पूलाचे उद्घाटन झाले. ३२८ मीटर लांबीच्या या पूलाला चार लेन आहेत, ज्यामुळे क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी आणि धोबी तलाव या भागांतील वाहतूक आता अधिक सुलभ होईल.
पूलाचे नाव ‘सिंदूर पूल’ असे ठेवण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत:
‘ऑपरेशन सिंदूर’ – भारताने अलीकडेच पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या लष्करी कारवाईच्या यशाचा सन्मान.
वसाहतवादी वारशाचा पगडा दूर करणं – ब्रिटिश गव्हर्नर कार्नाक यांच्या नावाशी जोडलेल्या जुना पूल विसरून, भारताच्या सामर्थ्य आणि शौर्याची ओळख निर्माण करणे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “हे केवळ नावबदल नाही, तर इतिहासातील काळे अध्याय पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे.” त्यांनी समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा उल्लेख केला, ज्यात कार्नाकने छत्रपती प्रताप सिंह राजे आणि रंगो बापूजी यांच्याविरोधात कट रचल्याचा इतिहास नमूद आहे.
बांधकाम १३ जून २०२५ रोजी पूर्ण झाले होते. मात्र काही प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला. शिवसेना (UBT) आणि मनसे यांनी या विलंबाविरोधात आंदोलन देखील केलं होतं.
सिंदूर पूल हे फक्त एक पायाभूत सुविधा नसून – तो भारताच्या नवीन युगातील, आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेल्या राष्ट्राचे प्रतीक आहे.
सिंदूर पूल हा केवळ वाहतुकीसाठी नाही, तर तो भारताच्या नवे युगातील ओळखीचं, शौर्याचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. वसाहतवादी काळाच्या पावलांवरून पुढे जात, भारताची स्वतःची ओळख अधोरेखित करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
for more visit – currentaffairs.adda247.com
View all