भारतात होणार 38,000 हून अधिक शिक्षकांची भरती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या वर्षासाठीचा देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातही अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची आहे ती शिक्षकांची भरती. देशभरातील 740 एकलव्य शाळांमध्ये पुढील 3 वर्षांत 38,800 शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

2018 मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एकलव्य शाळांची योजना आणली होती. या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिक्षण दिले जाते. अर्थमंत्र्यांनी या शाळांच्या बजेटमध्ये 581.96 कोटी रुपयांची वाढ करून 38,800 शिक्षक भरतीची माहिती दिली.

राष्ट्रीय शिकाऊ योजना सुरू होईल
याशिवाय अर्थमंत्र्यांनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली आणि पुढील तीन वर्षांत ४७ लाख तरुणांना भत्ता दिला जाईल, असे सांगितले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रीय शिकाऊ योजना सुरू करण्याची घोषणाही केली. यासोबतच पीएम कौशल विकास योजना 4.0 सुरू करण्याबाबतही अर्थमंत्र्यांनी माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles